मराठीचं पानिपत.

आज ९ नोव्हेंबर २००९ महाराष्ट्राच्या इतिहासतील काळा दिवस म्हणून नोंद होईल. महाराष्ट्राच्या विधानसभेत आज मराठी माणसाची, मराठी भाषेची आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लत्तरे टांगली गेली. “या साठीच का केला होता स्वराज्याचा अटहास“? कोण, कुठला अबू आझमी, आपल्याच घरात येऊन, आपल्यालाच आवाहन देतो आहे. संविधानाच्या आड लपून हा आपल्याला हिणवत आहे.

ज्याला निवेदनाची भाषा कळत नसेल तर करावे तरी काय? हा माझा प्रश्न आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमदारांनी लढलेल्या एकतर्फी युद्धाचे निषेध करणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला. हात जोडून विनंती कळत नसेल तर तोच हात त्याच्या श्रीमुखात देण्याची हिम्मत मराठी माणसात आहे, हे आज प्रत्येक महाराष्ट्र द्रोही माणसाला चांगलेच कळले असेल.

लाज आणि चीड या गोष्टीची वाटते की मराठी माणसाच्या आणि मराठी स्वाभिमानाच्या गमज्या मारणाऱ्या शिवसेनेने का समर्थन नाही केले आज मनसेच्या आमदारांचे? एका प्रसंगाची आठवण करून देतो, राष्ट्रपती पदासाठी जेव्हा कॉंग्रेसच्या प्रतिभा पाटील यांचे नाव पुढे आले, तेव्हा भाजपा चा विरोध डावलून माननीय बाळासाहेबांनी प्रतिभा पाटील यांना समर्थन दिलं होत, का? फक्त त्या महाराष्ट्राच्या म्हणूनच ना? तर आज काय शिवसेना झोपली होती?

मराठी मतं फक्त सत्तेसाठी का? शंका येत होती शिवसेनेच्या धोरणांवर, आज मात्र शंके वर शिकामोर्तब झालं. आज महाराष्ट्रा बद्दल कळवळा असलेलं प्रत्येक मराठी मन रडत असेल. आज परीक्षा होती शिवसेनेची आणि निकाल काय हे सर्व जाणतात. अहिंसेची भाषा कमीतकमी शिवसेनेनी तरी करू नये. आत्ता शिवसेना कोणाची आणि कोणाचा रिमोट? हा प्रश्न नाही विचारला तरच नवल.

भारतीय जनता पक्षा कडून तर काही अपेक्षाच उरल्या नाही आहेत. ते गृह्क्लेशात संपणार हेच खरे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांनी तर कधीच महाराष्ट्र विकायला काढला आहे. “कॉंग्रेस चे एकाच धोरण, सत्तेसाठी राजकारण..” हेच खरे. यांना घडल्या प्रकाराबद्दल काहीच घेणे-देणे नाही असं म्हणलं तर काहीच चूक ठरणार नाही. यांना आता चिंता असेल ती मिळालेल्या खात्यांची, पुढच्या पाच वर्षात कसे-कसे आणि कुठून-कुठून महाराष्ट्राला पोखर्ता यईल याची. बाकी भोंदू बाबाची सेवा अखंड रित्या सुरू आहेच.

आता उरले “सत्याची” बाजू मांडणारे पत्रकार बांधव… माझ्या भाषेत “बघे”. यांना फक्त “ब्रेंकिंग न्यूस” पाहिजे, TRP कशी वाढणार हीच चिंता. यांना लढणं माहित नाही, यांना प्रतिकार माहित नाही, यांना योग्य- अयोग्य काय याच्याशी घेणे नाही, फक्त मोठ्या बाता. हि अहिंसा आहे, हे संविधानाला अनुसरून नाही, हे सगळं मांडण्यात हे बेजार. ब्रष्ट नेते येतात आणि आपलं काम करून जातात, पत्रकार मंडळी फक्त प्रश्न विचारतात, उत्तरे ऐकतात, तेच जोडून- तोडून छापतात आणि म्हणतात “आता वळूया पुढच्या बातमी कडे”. ते तरी बिचारे काय करणार, सगळे वृतपत्र आणि वाहिन्या कोणच्या तर बड्या- बड्या नेत्यांच्या.

उरली जनता, त्यांना कोण विचारणार. मतदान झाले आता आपल्याला कोणी विचारत नाही हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. मग बातमी या कानांनी ऐकाची, थोडे शिव्या- शाप द्यायचे आणि दुसऱ्या कानांनी सोडून द्यायचे. पुन्हा पुढच्या निवडणुकीत तीच चूक करायची आणि मग बसायच बोंबलत.

अभिमान याच गोष्टीचा की, कमीतकमी महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक प्रचारात हाती घेतलेल्या मुद्यांना सभागृहात मांडते आणि त्या साठी कोणच्याही कारवाईची भीती ना बाळगता लढते. तरीही ज्यांना वाटते की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सभागृहाचा अपमान केला आहे, त्यांना मी सल्ला देतो की, विरोधी पक्ष म्हणून गप्प बसणारा आमचा पक्ष नाही. आमचा इमान हा मराठी जनतेशी आणि त्याच्या विकासाशी. बाकी सर्व गोष्टी या शुल्लक. मी कधीही हिंसेचा समर्थक नसणार, पण जर कोणी महाराष्ट्राच्या मुळावर घाव घालेल, तर त्याला आम्ही सोडणार नाही. त्याला समजणाऱ्या भाषेत आम्ही त्याला उत्तर देऊ. माननीय शिशिर शिंदे, रमेश वांजळे, राम कदम आणि वसंत गीते यांचा आम्हाला अभिमान आहे.

मनसेचे १३ आमदार होते, चार निलंबित झाले, उरले ९. पण आता आम्हाला खात्री आहे की, हे नऊ नक्कीच सरकारला पुरून उरतील आणि महाराष्ट्राच्या नेत्यान समोर एक नवा आदर्श मांडतील.

- जय महाराष्ट्र.

Random Rumbles – IV

Its 3:12 am, i got to study, i got to sleep, i got to wake up early, i got to survive tomorrow and i got to go to bed. So many things to do, just one stupid soul going through shit :(  . Am i cribbing? yeah definitely i am, don’t you think so? Why, why, why ? Whats that music at the back? ….

कहाँ से तू आती है कहाँ को तू जाती है

सपनों को सजाती है अपनों को ले जाती है

बाघों में जब बहती है कानों में कुछ कहती है

आती है नज़र नहीं साँसों में पर रहती है

हवा है पवन है वायु है, पुरवाई है

जीवन है,जान है,या परछाई है

लेने आई है या कुछ मेरे लायी लायी है

पूछूंगा में क्या तुझसे कहाँ से तू आई है….

खट खट कोई नहीं ऐसा एक झोंका है

कुछ है,सच है,या तू एक धोका है!! तू कौन है,तू कौन है …




Why did i put that in here, beats are awesome, meaning is confusing and voice is mysterious. Oh, why am i cribbing? Just i think i have had enough trying to be a wise man. Why just i can be messy and happy all at the same time, my messiness gives me a guilty feeling, why am i blessed with this intelligent brain. How do i asses right from wrong? What do i do? Where do i find,  for what i am made? I guess nobody knows.


We still travel, we still fight to survive, we still get angry, we are desperate to be happy, we still want to get accepted and we still want to get loved. Is the notion that “every thing happens for good” really logical (Oh!! what is logic?) or this just stamps our helplessness.

Should i bother about making money? should i be chasing it or live the way i want to and make the money follow me. What if i don’t even earn a single penny in this life. Would i be a waste, a blot on my family. Why do i have to take responsibilities. I so wish, i get out of this mess, cause i know with time its only going to get deeper and messier. I know all the right things (wise man huh!!) the thing is that i wont do those things. Am i just plain, simple LAZY?

Was today a real bad day? Or am i now making tomorrow a bad day? I know this anger and depression will subside but i know it’ll knock back and i’ll crib again. Am i dying a slow death everyday? Is everybody dying a slow death?

What is wrong? Why am i correcting grammatical errors? What am i proving? Yeah i still remember those days, I was striving hard for someone, i was very jealous and insecure at that time, yeah i do remember…every bit of it, her every smile, her every wish, her every call, was she really the way i saw her? Or was i completely and totally fooled? but by whom? By her?

How did things went wrong? Why did she went away? Why does it hurt? Why am i reacting? Was she really that important?

ये सच है चाहत पे कभी किसी का भी जोर नहीं

दिलबर की यादों को बांधे ऐसी कोई डोर नहीं…..

इक पल जो मिल जाए फिर वो चला जाए दूर कहीं

दुनिया में इस दिल के जैसा कोई मजबूर नहीं….

मेरे खुदा मुझे इतना बता

क्या ऐसा भी होता है प्यार…

Oh this cause the track changed and yeah this one is equally mysterious.  So what is love?

Questions a galore and we always try to sleep over them. May be i should postpone my cribbing. Yeah tomorrow would be different? This thoughts will disappear, only to pop up back some time later.  When are these questions going to be answered? Should i even bother to dig for them? Or let them kill me slowly. Should i stop? Am i done for the night? 4:19 am tomorrow is awaiting me…is it going to be a new start…yeah i have to get back in my robes of a sensible/wise man.  I got to be STRONGER.

taa-da!!.


याला कोण विचारतंय!!

वरील क्लिप तुम्ही पाहिली असेलच. अनुराग कश्यप च्या विचित्र विधानाचा मी निषेध करतो. याची  ”DEV D” ची अजून उतरलीच नाही आहे, अजून हा नशेत आहे हेच वाटतंय.

मूळ मुद्दा काय? तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने “शांतपणे” केलेल्या आंदोलना मुळे “Antichrist” या चित्रपटाचा प्रयोग बंद पडला. चित्रपट अशलील आहे का? या बाबत जर तुम्हाला माहिती हवी असेल तर http://www.imdb.com/title/tt0870984/parentalguide हे पान बघा. सरळ स्पष्ट उत्तर आहे कि, हो चित्रपट तर अशलील आहेच. तर मग आंदोलन केलं तर काय चुकलं.

म्हणजे या स्वघोषित पुरोगामी विचारांच्या लोकांनी बंद दरवाजात काहीही पाहिलं तर चालतं. यांच्या अशलील्तेवर आम्ही बोट ठेवलं तर आम्हीच अशलील असा प्रचार करतात.

आता यांना पाठीशी कोण घालणार तर, आपले हिंदी भाषिक वृतवाहिनी वाले. यांची भाषा तर बघा “..मुंबई में महाराष्ट्र नवनिर्माण सेना की डराने, धमकाने और हंगामे की राजनीती फिर शुरू हो गयी है…” असा अपप्रचार केल्यावर कोणाचं रक्त नाही खवळणार. खरं- खोटं, चूक- बरोबर काही बघायच नाही, मनसे जे काही करेल ते चूकच, हा एकच न्याय.

अनुराग कश्यप याने विनाकारण राज साहेबांवर वयक्तिक टीका केली आहे. यासाठी त्याला जाहीर माफी तर मागावीच लागेल. आत्ताच जर हे ठेचलं नाही तर, उद्या उठसुठ कोणी ऐरागैरा तोंडसुख घेईल. आत्ता पर्यंत मनसे ने आत्मसात केलेला शांततेचा पवित्र कौतुकास्पद आहे, पण या कश्यप सारख्यांना हि भाषा कळेल असे वाटत नाही.

प्रत्येकाला हा संदेश गेला पाहिजे कि, या महाराष्ट्रात फक्त मराठी माणसाचाच आवाज चालतो.मुंबई आणि महाराष्ट्र जर कोणाच्या बापाचा असेल तर तो आमच्याच.

- जय महाराष्ट्र!

महाराष्ट्र नवनिर्माण सेना bloggers community on Orkut!!

mns bloggers badge

ह्या community चा मूळ उद्देश आहे : Electronic media मध्ये सुरु असलेल्या मनसे विरुद्धच्या अपप्रचाराला उत्तर देण्यास तय्यार असलेल्या netizens ना एकत्र आणणे. माननीय राजसाहेब ठाकरे यांनी सुरु केलेल्या “महाराष्ट्र नवनिर्माणाच्या” यज्ञात ही community एका समिधे प्रमाणे काम करेल.

आपण मनसे च्या प्रत्येक पाउलाचा लोकांना बरोबर अर्थ समजून दिला पाहिजे. राज साहेब तर आहेतच, तरी आपण सुद्धा आपापल्या blogs मधून मनसे विरुद्धच्या अपप्रचाराला उत्तर देऊ.  ”TRP/breaking news” साठी धडपडणाऱ्या पत्रकारांना धडा शिकवण्यासाठी आपलं योगदान आवश्यक आहे. मूळ मुद्दा राहतो बाजूला आणि यांचा आपलं सुरु असतं “फिर उगला राज ठाकरे ने ज़हर!!“.

हे सगळं थांबवायचं असेल तर आपल्याला आत्ता पासून जागरूक राहिलं पाहिजे. जनतेची दिशाभूल होता कामा नये, समाजात चुकीचा प्रचार होता कामा नये.

भेट द्या : http://www.manase.org/

- जय महाराष्ट्र.

Post a Comment On: Passionate About India “THE DANGEROUS DESIGNS OF THE CHINESE WILL COME TRUE IF INDIA DOESN’T START ACTING IN A COMMITTED MANNER IMMEDIATELY”

This is continuation of my comment on Arindam’s blog titled above.

Passionate about India

Passionate about India

Published in:  on ऑक्टोबर 26, 2009 at 3:00 pm प्रतिक्रिया (१)

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती !!

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती

देव, देश आणि धर्मा पायी प्राण घेतला हाती.

आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत

तलवारीशी लगीन लागलं जडली येडी प्रीती.

लाख संकटं झेलून घेईल अशी पहाडी छाती

देव, देश आणि धर्मा पायी प्राण घेतला हाती.

जिंकावेवा वा कटून मरावं हेच आम्हाला ठावं

लढून मरावं मारून जगावं हेच आम्हाला ठावं.

देशापायी सारी विसरू माया ममता नाती.

देव, देश आणि धर्मा पायी प्राण घेतला हाती.

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती!!

वंदे मातरम्!

indian-flag (1)

आज १५ ऑगस्ट तर नक्कीच नाही, मग या पोस्ट चा हेतू काय? आहे कारण आहे, महाराष्ट्रात काही वेळा पासून उभारलेला मुद्दा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाने केलेल्या आंदोलना मुळे खूपशे गैरसमज झाले होते, त्यांची ही उत्तरे. कोणी याला प्रांतवाद म्हणेन तर कोणी देशद्रोह, मला कोणाला काहीही उपदेश द्याचा नाही आहे आणि कोणाची बाजू देखील मांडायची नाही आहे. मी फक्त माझे वयक्तिक मत सांगत आहे.

१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला, नंतर अनेक आंदोलनं आणि सत्याग्रह लागले या भारताला आजचे जे स्वरूप आहे ते प्राप्त होण्यासाठी. मग भारतात राज्यं बनवली, माझ्या मते सगळी राज्य ही बहुदा भाषे च्या अधारे स्थापन करण्यात आली. भारताने लोकतंत्र आत्मसात केले. यात प्रत्येक राज्याला सरकार स्थापन करण्याचा अधिकार आहे, मग प्रत्येक राज्यात निवडणुका होतात. त्यातून त्या राज्यातले लोकं स्थानिक सरकार निवडतात. मग हे स्थानिक सरकार जवाबदार असते केंद्रातल्या सरकारला आणि मुख्यतः राज्यातल्या सामान्य जनतेला. राज्यातला सरकारची पहिली बांधिलकी असते ते त्या राज्याच्या जनतेशी आणि त्यांच्या विकासाशी. यात कोणाला काही गैर वाटत नसावं .

आता आपण वळू महाराष्ट्रा कडे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि आपल्या भारत देशाची आर्थिक राजधानी हीच. सहाजिक आहे की शिक्षणा साठी, वव्साया साठी आणि नौकरी साठी मुंबईमध्ये दररोज असंख्य लोकं येतात. एका आकडेवारी प्रमाणे मुंबईत येणाऱ्या लोकांमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून येणाऱ्या लोकांची संख्या ही जवळ-जवळ ७०% आहे. हे ७०% टक्के लोकं ही महाराष्ट्रातून येतात, त्या मुळे ही राज्य सरकारची जवाबदारी आहे की या लोकांची योग्य ती गरज पूर्ण करणे, त्यांना अन्नं, वस्त्र आणि निवारा देणे. यातही कोणाला काही गैर वाटत नसावं.

आत्ता प्रश्न आहे उरलेल्या ३०% लोकांचा, जे महाराष्ट्राच्या बाहेरून आले आहेत. भारताच्या संविधाना प्रमाणे, भारताच्या प्रत्येक नागीरकला संपूर्ण भारतात कोठेही वास्तव्य करण्याची परवानगी आहे, मग बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी जवाबदार कोण? राज्य सरकार की केंद्र सरकार? माझ्या मते राज्यातल्या सरकारची पहिली जवाबदारी आहे ती राज्यातल्या जनतेची आणि मग जेव्हा राज्यातली जनता संतुष्ट आहे, मग राज्यातल्या सरकारने इतर गोष्टीत लक्ष घालावे.

मुद्दा हा आहे की “लोकं स्थलांतर करतात का?”. एक उदाहरण असे की, समजा एक परिवार उत्तर भारतातून किंवा दक्षिण भारतातून महाराष्ट्रात स्थलांतरित झाले. आत्ता ही गोष्ट सर्वमान्य आहे की कोणीही आपली मातृभूमी उगाच सोडत नाही, स्वखुशीने तर मुळीच नाही. बरं जर येणाऱ्या व्यक्ती कडे काही काम असेल तर त्यांनी खुशाल येऊन रहावे आणि आपलं आयुष जगावे, त्यास मुळीच विरोध नाही. अडचण आणि अडगळ ते बनतात जे इथे विना काही काम-धंद्याचे येतात आणि अवैध रित्या वास्तव्य करतात. मुंबईत आत्ता अवैध रित्या वास्तव्य करणाऱ्यां मध्ये नेपाळी आणि बांगलादेशी देखील सामील झाले आहे. यांची जवाबदारी राज्य सरकार काय, केंद्र सरकारनी तरी का घ्यावी.

पण इथेच सगळा घोळ आहे. मतांच्या राजकारणामध्ये ह्या कॉंग्रेस वाल्यांनी देश विकायला काढला आहे. कोणीही या, कोठेही राहा, झोपडपट्या बांधा. या अश्या लोकांना कॉंग्रेस सरकार शिदापत्रक देणार, यांच्या झोपडपट्या वैध ठरवणार, गरीबांचा कळवळा असल्याचा आव आणणार आणि यांना मतदार बनवणार, मग सत्ता गाजवणार. हे कोठे तरी थांबले पाहिजे, महाराष्ट्राच्या काही आंतरिक समस्या आहे, इथे जन्मलेल्या लोकांचा प्रथम हक्क आहे इथल्या सर्व वस्तूंवर. हे दिल्लीश्वरांना कळले पाहिजे. साठ वर्ष्यात या बाबतीत कोणीही स्पष्ट भूमीका घेतली नाही, सगळेच नुसती टोलवा-टोलवी करतात.

ह्या सगळ्या परिस्थिती मध्ये जर कोणी एक पक्ष, ठाम भूमीका घेत असेल, तर त्यात गैर काय. का त्या पक्षाला आणि त्या नेत्याला, केंद्रातील आणि राज्यातील कॉंग्रेस सरकार देशद्रोही म्हणतात. महाराष्ट्रा च्या प्रश्नांची उत्तरे आणि निर्णय दिल्लीत नव्हे तर मुंबईत झाले पाहिजेत. केंद्रातील सरकारने ज्या राज्यातून अधिक स्थलांतर होत आहे अश्या राज्यांवर दबाव आणला पाहिजे. या स्थलांतर मागची कारणं जाणून घेतली पाहिजे आणि त्यावर कठोर निर्णय घेतले गेले पाहिजे. जे चुकतात त्यांना शासन केले पाहिजे. इथे चोर सोडून संन्याशाला शिक्षा होत आहे. हे मुळीच सहन केले जाणार नाही, मग या साठी ठोकशाही वापरावी लागली तरी हरकत नाही.

यात महाराष्ट्र कोठे ही देशद्रोही नाही. दिल्लीश्वरांचे पाय चाटत नाही, ते जर देशद्रोही असतील, हो तर आहे आम्ही देशद्रोही. प्रत्येक राज्याने आपापली प्रगती केली पाहिजे, स्थानिक लोकांचा विकास केला पाहिजे, आपापली राज्य समृद्ध केली पाहिजे. स्वतःच्या चुका जाणून घेऊन , त्यावर उपाय केला पाहिजे. प्रत्येक राज्यांनी जर स्वताला समृद्ध बनवलं तरच भारत देश हा सुजलाम सुफलाम होईल. तरच भारत हा एक प्रगत देश बनेल.

- जय हिंद, जय महाराष्ट्र!

2 States: A review

2 States: The story of my marriage2 states img_book_4_cover is the fourth novel of Chetan Bhagat (CB).  Let me start from the cover and printing of the book. The cover is good, not too tacky like the “The three mistakes..”, but printing quality is below standards, I’m wondering if they played a bit with the printing and paper quality, just to cut back on costs and keep the price of the book at Rs. 95 (And I have bought an original print).

2 States is a trademark CB book from the very first word till the end. It has the same magic of CB that has made reading fun and I read it somewhere that “India is a reading like never before” because of CB. Reports say “2 States is selling like hot cakes”.

2 States for me was a “grown up and toned down” novel. I call it “grown up” because, the novel is more about life after college and “toned down” because I think life out of campus is more civilized. The main character Krish, I think gets the girl Ananya, far too easily to be true, but the emphasis was on the marriage, so Krish was bound to get Ananya without much effort. The intimacy between the characters grows lightening fast, again emphasis being the marriage the first kiss and (you know what :P ) happens too early in the story. Ananya and Krish start with studying together, then sleeping together and then staying together. And again the two years of IIMA pass away in a flash.

I remember reading that after FPS, CB was criticized that he writes for college kids and not the real youth and because of this “One night …” came up, to portray the life out of college. I think this novel follows that trend. One thing to mention, the way in which Krish proposes Ananya amidst an interview with some big MNC didn’t go down well with me, appears too filmy! (CB still not out of the “Hell-oh” fiasco.) Then starts the corporate life, depiction of the office staff was nice and the ambiguity which Krish has to face while choosing his job location is very witty.

Then Krish enters Chennai (a.k.a Chain- nahi!), first few people he meets and he knows that he has landed at a wrong place, but he is well aware about his reasons for being in Chennai. A fun loving, youthful, just out of the college Punjabi boy in Chennai is something like opposites ends of the road. But trust me, the book gains momentum from here and everything that happens with Krish in Chennai is going to be the reason behind the success of 2 States. The stark differences in the life style of Punjabi and Tamilians is the crux of this book. The struggle that Krish faces convincing Ananya’s parents and the struggle that Ananya faces understanding Krish’s mother is really interesting. Krish’s hypocrite father suddenly turns into a hero at two instances, but this part of the story is also good.

All in all a good read if you are a fan of CB and for anyone reading CB for the first time will be getting complete value for his 95 bucks! The instances in the story which takes us back to the FPS is fascinating and is my favorite part of the book. The idea of connecting 2 States and FPS is awesome and it has worked.

PS: Please buy the original copy of 2 States and avoid piracy.

मतदान करा!!

matadan

आज १३ ऑक्टोबर २००९, महाराष्ट्रात आज विधानसभे साठी मतदान होत आहे. लोकशाहीत नागरिकाला मिळालेला सर्वात मोठा हक्क बजावा. आपलं मत अमूल्य आहे, ते योग्य त्या उमेदवारालाच द्या. हीच वेळ आहे महाराष्ट्रा ला योग्य दिशा देण्यासाठी. आपण देणारे प्रत्येक मत हे जणू महाराष्ट्रासाठी येणाऱ्या पाच वर्षात एका दिव्या प्रमाणे आहे. जागृत राहून मतदान करा. छोट्या- मोठ्या अमिषाला बळी न जाता मतदान करा. आज वेळ गेली, तर मागून पश्याताप करावा लागेल. महाराष्ट्र धर्म वाढवा…. मतदान करा!!.

-जय महाराष्ट्र!

Published in:  on ऑक्टोबर 13, 2009 at 6:08 सकाळी प्रतिक्रिया नोंदवा
Tags: , , ,

सिनेतारकांचा “जलवा” ?

salman1

सिनेमातले नट- नट्या राजकारणात येणे हे काही गैर नाही. ते येऊन काम करतात का नाही, तो वेगळा मुद्दा आहे. पण यातून एक नवीनच “खूळ” आलं, ते म्हणजे निवडणूक प्रचारासाठी “नट- नट्या” बोलवणं. मला या मागचा हेतूच कळत नाही. एक उघड-उघड सत्य आहे की, जे नट- नट्या येतात त्यांना अमाप पैसा मिळतो. म्हणून “ते” का येतात हे आपण समजू शकतो.

आत्ता प्रश्न आहे तो उमेदवार त्यांना का बोलवतात? मला तर वाटत की आपली “पोहोच” दाखवण्यासाठी आणि गर्दी गोळा करायला. थोडक्यात “हवा” करायला. आजच संभाजीनगर मध्ये सलमान खान चा रोड्शो झाला, त्याला आणणारे होते कॉंग्रेसचे राजेंद्र दर्डा. शो तर काही झाला नाही, लोकांनी मात्र चांगला लाठी मार खाल्ला, सार्वजनिक मालम्तेच नुकसान झालं आणि आधीच अनेक समस्यांनी ग्रासलेल्या “सामान्य” माणसाला एक नवा ताप.

ठीक आहे! झालं ते वाईट झालं. यातून काही शिकतील असं म्हणावं तर “सलमानराव” लगेच थेट सोलापूर च्या वाटेवर. इथे उमेदवार होत्या प्रणिती शिंदे, या आहेत माननीय सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या. बरं सलमान कमी की काय म्हणून इथे रितेश देशमुखांची भर. मग होणार तेच झालं “राडा”. इथे तर परिस्थिती एवढी हाता बाहेर गेली की रोड्शो आणि सभा दोनीही रद्द. वर चाहत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा गोंधळ. पोलीस हतबल, मग गर्दीवर लाठीमार, त्यात लहान, मोठे,महिला, पुरुष सगळ्यांना एकच न्याय, दे दणादण!.

बरं एवढा सगळा खटाटोप केला. पण खरच या भाडोत्री गर्दीच रुपांतर मता मध्ये होत का? हा आहे मूळ प्रश्न. खरंच आमक्या उमेदवाराने अमुक नट- नट्या आणल्या, आणि त्या मुळे तो जिंकला, असं माझ्या तरी माहितीत नाही. जनता नट- नट्या पाहून कधीच मतदान करणार नाही आणि असं झालं तर ते फक्त “दुर्दैव्य”.

अजून एक महत्वाचा मुद्दा. या नट- नट्या ज्याकोणासाठी प्रचारात उत्तरतात, ते खरंच त्या उमेदवाराला ओळखतात का?. आपण ज्या व्यक्तीचा प्रचार करत आहोत, ते योग्य आहे का? या सगळ्याची तपासणी केल्या खेरीच प्रचार करणे हा केवळ नट- नट्या यांचा वैयक्तिक निर्णय आहे. शेवटी चांगला उमेदवार निवडून देणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे.

मला तर वाटतं, कसला आलाय “जलवा”. मूर्ख-भेकड कुठचे, स्वताहात धमक नाही, स्वताच कार्य नाही …म्हणून नट लागतात यांना प्रचाराला.

- जय महाराष्ट्र!